बहुतांश राजकीय नेते मराठा समाजातील असतीलही, मात्र मराठा समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत नाहीत. शेतीची विभागणी झालीये..... त्यामुळे बहुतांश जणांना चार-पाच एकरांपेक्षा अधिक जमीन नाही. त्याच पावसाचा भरवसा नसतो. पिके आली तरी त्याला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसते. महागाईचे संकट तर पाचवीला पूजलेलेच आहे. ही परिस्थिती अनुभवल्यामुळेच जरांगे पाटील यांनी हा गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू केलाय